नवी दिल्ली -कर्नाटकमधील कॉंग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोरांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी आमदार म्हणून अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला याआधीच आव्हान दिले आहे. त्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी आता केली आहे.
काही आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे कर्नाटकमधील कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार कोसळले. सरकार कोसळण्याआधी विधानसभेचे तत्कालीन सभापती के.आर.रमेश कुमार यांनी दोन्ही पक्षांच्या 17 बंडखोरांना आमदार म्हणून अपात्र ठरवले. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका बंडखोरांनी न्यायालयात दाखल केली आहे.
त्यावर तातडीने सुनावणी घेण्यासाठी आपल्या रजिस्ट्रारकडे मेमो सादर करावा, असे न्यायालयाने मंगळवारी बंडखोरांना सांगितले. संबंधित सुनावणी 19 ऑगस्टला घ्यावी, अशी बंडखोरांची मागणी आहे.