Amit Shah In Nanded – महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र येवून महायुतीला (MahaYuti) आव्हान देत आहेत. परंतु महाराष्ट्रात यातील नकली शिवसेना (Shiv Sena), नकली राष्ट्रवादी (NCP) आणि अर्धी संपलेली कॉंग्रेस (Congress) आहे. हे लोकांचे भलं करू शकत नाही. यांच्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केला. ते नांदेडमध्ये (Nanded Lok Sabha) आयोजित प्रचार सभेला संबोधित करत होते. (Fake Shiv Sena and NCP in Maharashtra and the half-finished Congress cannot do good to the people – Amit Shah)
अमित शहा म्हणआले, कॉंग्रेसवाल्यांना वाटत आहे की, नांदेडचे हवामान बदलले आहे. त्यामुळे सभा होणार नाही. परंतु मी त्यांना सांगतो की, देशाचे हवामान बदलले आहे. फिर एक बार चारसो पार नक्कीच होणार आहे. प्रतापराव पाटील चिखलीकर ( Prataprao Patil Chikhlikar) यांना मत म्हणजे मोदींना मत आहे, असे म्हणत त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान भाषणातील महत्वाचे मुद्दे –
-उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवारांची एनसीपी अर्धी झालेली आहे. यांनी मिळून कॉंग्रेसला देखील अर्ध करू टाकले आहे.
– दोन नकली अन् एक अर्धवट झालेली कॉंग्रेस पार्टी महाराष्ट्राचे भलं करू शकत नाही.
– या तीन चाकी अॅटो रिक्षाला कोणतेही भवितव्य नाही. कोणतेही धोरण नाही.
– हे निवडणूकीच्या नंतर आपपासांत वाद घालणार आहेत. तर दुसरीकडे मोदींच्या नेतृत्वात देशभक्तांची टोळी एनडीएमध्ये आहे. देशाच्या विकासासाठी एनडीए विचार करत असून त्या दृष्टीने विकास करत आहे.
– काश्मीरमधील 370 कलम हटले पाहिजे की नाही, तर देशातील प्रत्येकाला वाटते की, हे हटले पाहिजे, ते काम भाजपने करून दाखवले.
– पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी जातीवादी आणि कुटुंबावर आधारित पक्ष एकत्र आले आहेत.
– काँग्रेसने 70 वर्षे जातीवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराच्या आधारे राज्य केले.
– मोदींनी देशातून जातीवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचार संपवला.
– ज्याने भ्रष्टाचार केला, ज्याने चोरी केली त्याला तुरुंगात जावे लागेल.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबांना गरिबीतून बाहेर काढण्याचे काम केले आहे. त्यांना स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर आणि राहण्यासाठी घरे देण्यात आले आहेत.
– आम्ही देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आणली आहे. मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, ते तिसऱ्या क्रमांकावर पोहोचतील.
– अभिमानी आघाडीच्या नेत्यांना आपल्या मुला-मुलींनीच पुढे जावे असे वाटते.
– ममता बॅनर्जींना त्यांच्या पुतण्याला बढती द्यायची आहे, शरद पवारांना त्यांच्या मुलीला बढती द्यायची आहे, स्टॅलिन यांना त्यांच्या मुलाची जाहिरात करायची आहे आणि सोनियाजींना त्यांच्या मुलाला बढती द्यायची आहे.
– अहंकारी आघाडी जिंकली तर ओबीसींचे सर्वाधिक नुकसान होणार आहे.
– काँग्रेस हा ओबीसी विरोधी पक्ष आहे.
– मोदी सरकारमधील 27 मंत्री ओबीसी आहेत, 37 टक्के खासदार ओबीसी आहेत, मोदींनी ओबीसी आयोगाची स्थापना केली आणि त्याचबरोबर केंद्रातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याचे काम केले.