Sushma Andhare । मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिल्याचं जाहीर केलं. पंतप्रधान मोदींसाठी पाठींबा देत असल्याचं राज ठाकरे म्हणाले. यानंतर ठाकरे गटाने मनसेवर टीकास्त्र सोडलंय. यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर जोरदार निशाणा डागलाय. “राज ठाकरे यांची भूमिका महाराष्ट्रातली जनतेला निश्चितपणे पटणारी नाही, त्यांचा मोदींना पाठींबा आमचा विश्वास वाढवणारा आहे”, असं म्हणत कोल्ह्याला द्राक्षे आंबट, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी खोचक टीकाही केली.
जनतेला ही भूमिका निश्चितपणे पटणारी नाही Sushma Andhare ।
राज ठाकरेंच्या भूमिकेविषयी बोलताना सुषमा अंधारे यांनी,”मला प्रश्न विचारायचा होता की, एकीकडे राजकीय व्याभीचाराला समर्थन नाही, असं म्हणताना तुम्ही ज्यांनी वाया सुरत-गुवाहाटी करत अत्यंत कूटनीतीने आणि अक्षरशः खोक्यांचं राजकारण करत इथे सरकार बदललं, अशांना पाठिंबा देता. एकीकडे तुम्ही विचारांची भाषा करता आणि दुसरीकडे विचार बदलून टाकता. महाराष्ट्रातली जनता, जो कोणी संविधान प्रेमी आहे, त्याला ही भूमिका निश्चितपणे पटणारी नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
त्यांचा मोदींना पाठींबा आमचा विश्वास वाढवणारा
राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, “त्यांच्या व्याख्यानाचा आमच्यावर काही परिणाम होईल आणि खचून जाऊ वगैरे असं काहीच नाही. उलट मला असं वाटतं की, हा पाठिंबा आमचा विश्वास वाढवणारा आहे की, ज्या अर्थ एवढे सगळे लोक एका 84 वर्ष झालेला आणि एका अत्यंत घायाळ वाघाला हरवण्यासाठी एवढे सगळे ताकद लावतात, त्या अर्थी त्यांना अजूनही महाराष्ट्रात स्वतःबद्दल खात्री वाटत नाहीय, की आपण जिंकू शकतो.”असे म्हटले.
कोल्ह्याला द्राक्ष आंबट Sushma Andhare ।
सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली. यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, काय मला काही माहीत नाही दादा, काय झालं की, हे सगळं चालू होतं, तेव्हा मी म्हणींचं पुस्तक वाचत होते. मला कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी काहीतरी म्हण आहे, त्याचा अर्थ मी शोधत होते, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.