Farmer Girl Success Story : महिला आता पुरुषांच्या बरोबरीने चालत आहेत. मग ते शिक्षण क्षेत्र असो वा शेती. आज महिला प्रत्येक क्षेत्रात नाव कमावत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण भाजीपाल्याच्या शेतीतून लाखो रुपये कमावणाऱ्या महिलेबद्दल जाणून घेणार आहोत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील अनुष्का जयस्वाल या तरुणीने अभ्यासानंतर काम करण्याऐवजी शेतीचा मार्ग निवडला.
आज अनुष्का दरमहा 2 लाख रुपयांहून अधिकची कमाई करत आहे. तर 20 हून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. तिने वयाच्या 23 व्या वर्षी शेती करायला सुरुवात केली आणि आता ती 27 वर्षांची आहे. आज ती वार्षिक ४५ लाख रुपयांपेक्षा जास्त नफा कमावत आहे.
वयाच्या २३ व्या वर्षी शेतीची सुरुवात
एका हिंदी वृत्तवाहिनीवर बोलताना अनुष्काने सांगितले की, 2021 मध्ये तिने लखनऊच्या मोहनलालगंज भागात असलेल्या सिसेंडी गावात एक एकर जमीन लीजवर घेऊन याची सुरुवात केली. त्यावेळी मी 23 वर्षांची होते.
दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. मात्र तिला या क्षेत्रात काम करायची इच्छा नव्हती म्हणून तिने काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. सरकारकडून पन्नास टक्के अनुदान मदत मिलते म्हणून एक एकरावर पॉली हाऊस सुरू केल्याचे तिने सांगितले. आता ती आणखी 6 एकर शेती करत आहे, जिथे शिमला मिरची, कोबी, फ्लॉवर आणि इतर अनेक भाज्या आहेत. यातून त्यांना भरपूर नफाही मिळत आहे.
महिला शेतकरी अनुष्का जैस्वाल सांगते की, जेव्हा तिने हे शेत निवडले तेव्हा लोक म्हणाले की नफा होणार नाही. तोट्याचा सौदा आहे. मुलगी म्हणून शेती कशी करणार ? कामगारांशी कशी वागणार ? असे अनेक प्रश्न तिच्याबाबत लोकांनी उपस्थित केले. एवढे असूनही तिने हार मानली नाही आणि अवघ्या 4 वर्षात मेहनतीचे फळ मिळाले. वर्षाला 45 लाखांहून अधिक नफा मिळत असल्याचे देखील अनुष्काने यावेळी सांगितले.
भाऊ पायलट, बहीण वकील आणि वहिनी सॉफ्टवेअर इंजिनिअर
DU मधून उत्तीर्ण झालेल्या अनुष्का जैस्वालने सांगितले की, तिच्या शेतात पिकवलेल्या भाज्या लखनऊच्या सर्व मार्केट आणि अनेक मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये विकल्या जात आहेत. त्यामुळे सातत्याने नफा मिळत आहे. कौटुंबिक बॅग्राऊंडबाबत अनुष्काने सांगितले की, माझे वडील बिजनेसमॅन आहेत आणि आई गृहिणी आहे. तर माझा भाऊ पायलट आहे, बहीण वकील आहे. वहिनी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत.
कुटुंबाची पार्श्वभूमी शेतीची नसल्याने तिच्याकडे वडिलोपार्जित काहीही नव्हते. अशा परिस्थितीत प्रथम एक एकर जमीन भाडेतत्त्वावर घेण्यात आली. मग तीन एकर घेतली. त्यानंतर प्रशिक्षण घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने आपल्या कामगारांना प्रशिक्षणही दिले. आणि जास्तीत जास्त तंत्रज्ञान वापरला सुरुवात केली.
सेंद्रिय पद्धतीने हिरव्या भाज्यांची लागवड
तंत्रज्ञानाद्वारे कमी जमिनीतही अधिक उत्पादन कसे करता येईल हे समजले. परिस्थिती अशी होती की एका एकरात 50 टन इंग्रजी काकडीचे उत्पादन होते. तर लाल पिवळी मिरचीचे पीक ३५ टन होते. एवढेच नाही तर बाजारात सिमला मिरचीचा भावही चांगलाच मिळत आहे.
लखनौच्या सर्व बाजारपेठांमध्ये आणि अनेक मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये त्यांच्या शेतात पिकवलेल्या भाज्यांना मोठी मागणी आहे. आता महिला शेतकरी अनुष्का जयस्वालची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. विशेष म्हणजे ही महिला शेतकरी सेंद्रिय पद्धतीने हिरव्या भाज्यांची लागवड करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
प्रगतीशील शेतकरी अनुष्का म्हणाली की, तिला फलोत्पादन विभागाकडून ड्रॉप मोअर पीक अंतर्गत 90 टक्के अनुदान मिळाले, त्यामुळे भाजीपाला लागवडीचा खर्च खूपच कमी आहे त्यामुळे पिकांवर देखील अधिक लक्ष देऊ शकलो.