मुंबई – वेस्ट इंडीज व अमेरिकेत येत्या जुनमध्ये होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे, अशी घोषणा बीसीसीआयने केली आहे. भारतीय संघ तब्बल आठ वर्षांनंतर टी-२० मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. २०१६ सालानंतर भारत टी-20 मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. येत्या ६ जुलैपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार असून अखेरचा सामना १४ जुलै रोजी होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ आपले सर्व सामने हरारे येथेच खेळणार आहे. १ ते २९ जून दरम्यान होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेनंतर ही मालिका आयोजित केली जात आहे.
#AUSvWI 2nd T20 : मॅक्सवेलची स्फोटक शतकी खेळी; हिटमॅनच्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी…
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेचे वेळापत्रक ( वेळ रात्री ९-३० पासून)
(थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्टसवर)
– पहिला सामना- ६ जुलै (हरारे)
– दुसरा सामना- ७ जुलै (हरारे)
– तिसरा सामना- १० जुलै (हरारे)
– चौथा सामना- १३ जुलै (हरारे)
– पाचवा सामना- १४ जुलै (हरारे)