शेतमाल थेट पोहोचणार ग्राहकांच्या हातात
पिरंगुट – शेतकरी आठवडी बाजारातून ग्राहकांना चांगला फायदा होत आहे. शेतकर्यांना कोणत्याही मध्यस्थी शिवाय ग्राहकांपर्यंत थेट माल पोहोचवता येत असल्याने आर्थिक लाभ देखील होत आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविता दगडे यांनी केले.
पिरंगुट (ता. मुळशी) लवळेफाटा येथे श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी, राऊत सिरम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने व पिरंगुटच्या माजी सरपंच ललिता पवळे, माजी उपसरपंच व मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल पवळे यांच्या माध्यमातून शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी सविता दगडे बोलत होत्या.
यावेळी सरपंच चांगदेव पवळे, उपसरपंच लीलावती गोळे, माजी सरपंच शरद केदारी, माजी सरपंच ज्ञानेश्वर पवळे, उपसरपंच रंजित राऊत, माजी उपसरपंच अमर निकटे, पोलीस पाटील स्वाती गोळे, माजी सरपंच ललिता पवळे, माजी उपसरपंच सुरेखा पवळे,
अश्विनी निकटे, उद्योजक संतोष पवळे, सागर पवळे, माजी ग्रामपंचायत सदस्य शेखर गोळे, समीर केदारी आदी मान्यवर व ग्रामस्थ तसेच कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.