Aaditya Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे परदेश दोरे एकापाठोपाठ रद्द झाले आहेत. या रद्द झालेल्या दौऱ्यावरून आता विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर सडकून टीका केली आहे.
मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या परदेश दौऱ्याविषयी बोलताना आदित्य ठाकरे,”मुख्यमंत्री आणि मंत्री जनतेच्या पैशावर परदेश दौरे करत आहेत. पण तिथे जाऊन ते नेमकं करणार काय आहेत? कोण भेटणार, कुठल्या कंपन्या भेटणार हे माहिती नाही. त्यामुळे हे दौरे म्हणजे सुट्ट्या समजायला लागले आहेत का? असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. माझ्या टीकेनंतर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी दोन दौरे रद्द केले, यह डर अच्छा है असा खोचक टोला लगावला आहे.
त्यासोबतच पुढे बोलताना,”राज्यात घटनाबाह्य सरकार बसलंय. 6 हजार कोटींचा रस्ते घोटाळा लोकायुक्तांकडे नेणार आहोत. स्ट्रीट फर्निचर घोटाळासुद्धा नेणार आहोत. मुख्यमंत्री फक्त टेंडर शोधत असतात. या सरकारमध्ये अनेकांना फॉरेन ट्रिप करायला आवडतात. हे सुट्टी समजायला लागेल आहेत. या दौऱ्यातून निघतं काय? असा सवाल त्यांनी केला.
त्यासोबतच मुख्यमंत्री यांचा दौरा जर्मनी लंडनला निघाला होता. जर्मनीला हाय वे बघायला जाणार होते. मी प्रश्न विचारला की तुम्ही येथे जाऊन करणार काय? डाओसमध्ये आम्ही काय केलं ते सगळं समोर आणलं होतं. मुख्यमंत्री नेमकं परदेशात जाऊन करणार काय? हा प्रश्न विचारला तर 30 मिनिटात दौरा रद्द मुख्यमंत्र्यांनी केला. यह डर अच्छा है, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) सुद्धा घाणाला (Ghana) जाणार आहेत. मात्र इकडे आमदार अपात्रताप्रकरण रखडवून तुम्ही संसदीय लोकशाहीची हत्या करताय. सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात निकाल दिला. 4 महिने झाले, तेव्हापासून निकाल पुढे ढकलला जात आहे. मी अध्यक्षांना विनंती केली, तुम्ही जाऊ नका राज्याची बदनामी करू नका. त्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आला, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.