नवी दिल्ली : भारतीय हवाई सेवेतील अग्रेसर असणारी कंपनी एअर इंडियाने कात टाकली आहे. आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना तोड देण्यासाठी एअर इंडियाने आज आपला नवा लोगो, गोल्डन विंडो फ्रेम, सादर केली. हे सर्व बदल करण्यात आले असले तरी एअर इंडियाचा जुना विख्यात ‘महाराजा’ मात्र या सर्वात कायम राहणार असून त्याचा अन्य स्वरूपात वापर होणार आहे, याविषयीची माहिती एअर इंडियाच्या वतीने देण्यात आली आहे.
‘एअर इंडिया आणि द व्हिस्टा’ यांच्या एकत्रीकरणामुळे हा नवा लोगो तयार करण्यात आला आहे. कात टाकण्याच्या या प्रयत्नांमध्ये एअर इंडिया आपल्या विमानांची अंतर्गत दुरुस्ती, सजावट करीत आहे. त्यासाठी आतापर्यंत ४० कोटी डॉलर खर्च झाले आहेत.
पहिली एअरबस ३५० लवकरच ताफ्यात येत असून ७७७ व ७८७ या विमानांचे नूतनीकरणही लवकरच होईल, अस कॅम्पबेल म्हणाले. एअर इंडियाची नवी वेबसाईट आणि मोबाईल ॲप सेवेत आले असून नवे कस्टमर केअर सेंटरही लवकरच येईल.
आम्ही सध्या संक्रमण अवस्थेच्या मध्यात आहोत, ते पूर्ण होण्यासाठी खूप मोठा टप्पा गाठायचा आहे असेही ते म्हणाले. तर आम्ही एअर इंडियामध्ये नवे तंत्रज्ञान आणू, कंपनीला जागतिक स्पर्धेला तोंड देता यावे यासाठी या वर्षात पुष्कळ काम केले आहे. अजूनही ते करावे लागेल असेही ते म्हणाले.