Nuh Violence : नूह येथे सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर हरियाणातील चार जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 2 होमगार्ड जवानांचा समावेश आहे. राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू आहे. बुधवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार झाल्याच्या बातम्या आल्या, त्यामुळे परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. परिस्थिती पाहता नुहनंतर गुरुग्राम आणि पलवलमध्येही निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.
In order to maintain peace and public order, mobile internet services in the jurisdictions of Nuh, Faridabad and Palwal districts & in the territorial jurisdiction of Sohna, Pataudi and Manesar sub-divisions of Gurugram district will remain suspended till August 5: Haryana Govt pic.twitter.com/N8R9b7zG7J
— ANI (@ANI) August 3, 2023
त्याच वेळी, हरियाणाचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) TVSN प्रसाद यांनी बुधवारी संध्याकाळी एका आदेशात सांगितले की, नूह, फरिदाबाद, पलवल आणि गुरुग्रामच्या आयुक्तांनी मला अहवालाद्वारे सांगितले की, त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अजूनही गंभीर आहे आणि तणावपूर्ण आहे. त्यामुळे ५ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत मोबाईल आणि इंटरनेट सेवांवरील बंदी कायम राहणार असल्याच्या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत.
हरियाणातील नूह येथील हिंसाचारावर शोक व्यक्त करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्तेत बसलेल्या भाजप सरकारवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, ही कसली देशभक्ती आहे जिथे भावाला भावाशी भांडण लावले जाते. राहुल गांधी यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून भारताच्या प्रगतीसाठी देशात शांतता असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधी म्हणाले, देशात द्वेष पसरवणारा, भावाला भावाशी भांडण करण्यास प्रवृत्त करण्यास लावणारी ही कसली देशभक्ती? द्वेष आणि रागाने देश पुढे जाऊ शकत नाही, असे मी सुरुवातीपासून म्हणत आलो आहे. भारताला प्रगतीसाठी शांतता हवी आहे. ते म्हणाले की, मी सर्व भारतीयांना बंधुभाव जपण्याचे आवाहन करतो, हिंसाचाराने काहीही साध्य होणार नाही, फक्त आपल्या देशाचे नुकसान होईल.