मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली राजकीय उलथापालथ आणि त्यातून बदललेली गणिते यामुळे महराष्ट्रच्या राजकारण एक वेगळी दिशा मिळाली आहे. अशात आता (दि. १७) उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. अजित पवार सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेल्यामुळे सध्या विधिमंडळातील समीकरणे बदलणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री यांनी विरोधीपक्षनेता कोणत्या पक्षाचा असेल यावर भाष्य केलं आहे.
अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार गटाने शरद पवारांची भेट घेतल्यानंतर जयंत पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीचा कि काँग्रेसचा असणार ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अधिवेशन सुरु झाल्यावर निर्णय होईल असं पाटील म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले,”विरोधी पक्षनेते पदाबाबत आमची काँग्रेस आणि शिवसेशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या कमी असेल तर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाईल असही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच अधिवेशन चालू झाल्यावर विरोधी पक्षनेते पदाबाबतचा निर्णय होईल असंही पाटील म्हणाले.
सर्व आमदारांची मानसिकता शरद पवार यांच्यासोबत राहण्याची आहे. बरेच आमदार दोन्हीकडे असल्यासारखं दाखवत आहेत. अशात आमच्याकडे १९ ते २० आमदार आहेत अशी माहिती देखील जयंत पाटील यांनी दिली.