मुंबई – राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून “अजित पवार’ यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत.
अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता या सर्व चर्चांना अजित पवार यांनी पूर्ण विराम दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहे. महाराष्ट्राला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.
दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या अधिकृत ट्विट आकाउंटचे नाव देखील बदलण्यात आले असून, त्यापुढे आता ‘उपमुख्यमंत्री अजित पवार’ असं करण्यात आलं आहे. अजित पवार यांची गेल्या साडेतीन वर्षात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची तिसरी वेळ ठरलीय.