मुंबई :– मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवारी, पाडवा मेळाव्यात काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज ठाकरेंचे एक विधान चांगलच चर्चेत आले आहे. त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
मुबंईत “महाराष्ट्र शहीर’ या चित्रपटाच्या टीझर लॉंच कार्यक्रमाला ते उपस्थित होते. राज ठाकरे म्हणाले, 28 मार्चला “महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण 28 तारखेला मी येथे नाही. मी बाहेरगावी जात आहे. आम्ही सध्या दहावी नापास विद्यार्थ्यांसारखे आहोत.
आमच्या निवडणुका नेमक्या कधी लागणार? मार्च की ऑक्टोंबर? असे सध्या चालू आहे. त्यामुळे बहुधा सध्या मला दहावी नापास झाल्यासारखे वाटत आहे. कधी ऑक्टोंबर? ऑक्टोंबर आल्यानंतर मग कधी? मार्च बहुधा. त्यामुळे आमचे सध्या दहावी नापास झाल्यासारखं चालू असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांनी नववर्ष दुःखामध्ये साजरं करायचं का? मदतीवरून अजित पवार आक्रमक
निवडणूक नुसती येत नसते, ती वातावरणात असते. त्यामुळे सध्या निवडणूक मला वातावरणात काही दिसत नाही. त्यामुळे मध्ये थोडीशी गॅप मिळाली तर त्यात मी बाहेरगावी जाऊन येतो. गेल्या 4-5 वर्षांपासून मी कुठेच बाहेरगावी गेलो नाही. त्यामुळे म्हटलं जरा बाहेरगावी जावे. नातू झाला, त्यालाही बाहेर घेऊन जायचे होते, असेही राज ठाकरेने सांगितले.