नवी दिल्ली : लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाकडून मिश्राला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर करताना न्यायालयाने आशिष मिश्रावर काही अटी घातल्या आहेत. आशिष मिश्राला दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये राहता येणार नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. आशिष मिश्राला आठ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मागच्या वर्षी लखीमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना थार गाडीखाली चिरडण्यात आल्याची घटना घडली होती. यामध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतक पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आरोपींना बेदम मारहाण करणाऱ्या चार शेतकऱ्यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Lakhimpur Kheri violence case: SC grants interim bail to Ashish Mishra for 8 weeks
Read @ANI Story | https://t.co/Z2MFqTjmmQ#lakhimpurkheri #lakhimpurkheriviolence #SupremeCourtofIndia #ashishmishra pic.twitter.com/YtiBLF064e
— ANI Digital (@ani_digital) January 25, 2023
जामिनावर सुटल्यानंतर आशिष मिश्राला आठवडाभरात उत्तर प्रदेश सोडावे लागणार आहे. तसेच आशिष मिश्राला त्याचा राहण्याचा पत्ता पोलिसांना सांगावा लागणार आहे. तसेच दररोज त्याला पोलिस ठाण्यात रिपोर्ट करावा लागणार असल्याची अट सर्वोच्च न्यायालयाने घातली आहे.
साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव ते टाकू शकत नाहीत, असेदेखील न्यायालयाने म्हटले आहे. तसेच आशिष मिश्राला कोणत्याही साक्षीदाराला भेटता येणार नसल्यासही न्यायालयाने सांगितले आहे.