पुणे : देशाचे श्रध्दास्थान असलेल्या राम मंदिर निर्माण निर्णय व प्रक्रिया ही भाजप आणि मोदी-शहा यांच्या केंद्र सरकारची देणगी नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाची भेट आहे. त्यामुळे मंदिर निर्माण आणि ते पूर्ण होण्याची तारीख जाहीर करून भाजपने राजकारण करून केंद्रीय गृहमंत्रीपदावरील जबाबदार नेत्यांनी देशातील नागरिकांची दिशाभूल करू नये अशी टिका कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच 2024 मध्ये राममंदिर पूर्ण केले जाणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली होती. त्यावर तिवारी यांनी भाष्य केले आहे.
तिवारी म्हणाले की, न्यायालयाने अयोध्येतील विवादीत राम मंदीरा विषयी दिलेल्या निकाल व निर्देशानुसारच् श्री राम मंदीर_न्यास निर्माण करून, त्या न्यास (ट्रस्ट)चे माध्यमातुन मंदीराचे कार्य सुरू आहे ही सत्यता आहे. वास्तविक, मंदीर पुर्णत्वाची घोषणा ही अयोध्येतील श्री राम मंदिर न्यासचे वतीनेच रीतसर पत्रकार परीषद घेऊन जाहीर करणे अपेक्षीत होते. जर मंदीर न्यास तर्फे पत्रकार परीषद आयोजित करण्यात आली असती, तर मंदीर विकास कार्य विषयी अनेक पैलु पुढे आले असते. मात्र, तसे न होता भाजप याबाबत राजकरण करत आहे असं स्पष्ट मत तिवारी यांनी यावेळी व्यक्त केलं.