मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सीमा वादावर बोलताना, ‘सीमा वादावर आम्ही वारंवार पाठपुरावा करत होतो या संदर्भात अमित शहा यांना वेळ मागितली असता त्यांनी तात्काळ महाविकास आघाडीला वेळ दिला. याबाबत त्यांनी अमित शहा यांचे आभार देखील मानले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून घेत दोन्ही राज्यांना सबुरीने घेण्याचा सांगितलं असून तरीदेखील कर्नाटकाचे मुख्यमंत्री परत एकदा महाराष्ट्राच्या विरोधात उलट सुलट बोलायला सुरुवात केली हा अमित शहांचा फार मोठा अपमान आहे.
पुढे बोलताना त्यांनी “महाराष्ट्राच्या विरोधात मोठे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप देखील राज्यसरकारवर केला.यामागे कोणाचा अदृश्य हात आहे..हे आपल्याला सगळ्यांना बघावं लागेल..हे लवकरच देखील उघड होईल.अशा गोष्टी फार दिवस लपून राहत नाही, असे देखील म्हटले.
बारामती तालुक्यासह पुणे जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे यावर बोलताना सुळे म्हणाल्या की,’होम मिनिस्टर जबाब दो पुणे जिल्ह्याचा पालघर, नागपूर या ठिकाणी देखील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे, स्वतः गृहमंत्री नागपुरात असताना त्या ठिकाणी गुन्हा होतो हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे. मागच्या सरकारमध्ये फडवणीस स्वतः गृहमंत्री होते. त्यावेळेस देखील अशीच अवस्था होती त्यामुळे देवेंद्र फडवणीस हे गृहमंत्री पद सांभाळण्यात अपयश होत असल्याचा आरोप देखील सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर केला.
तर दिशा सालीयन प्रकारासंदर्भात सुप्रिया सुळे यांना विचारले असता महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू आहे अस सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तर धनगर आरक्षणाबाबत भाजप सरकार भूमिका घेत आहे का ? असा असा आरोप आपण केला होता त्यावर बोलताना सुळे म्हणाले की, मी आरोप करत नाही मी ऑन रेकॉर्डवर,डेटाबेस वर बोलते..ज्या पद्धतीने इडी सरकार ऑन रेकॉर्ड धनगर आरक्षणावर भारतीय जनता पक्षाचे खासदार काय बोलले.. यामध्ये देवेंद्र फडणवीस एक बोलतात आणि त्यांचे खासदार वेगळे बोलतात त्यामुळे सातत्याने खोटं आणि फसवनूक देवेंद्र फडवणीस आणि शिंदे सरकार करतय.. तसेच धनगर समाजासह मराठा समाज विभाग समाज मुस्लिम समाज असे अनेक घटक अस्वस्थ आहे. खोटं बोलून फसवण्याचं काम शिंदे फडणवीस सरकार करीत असल्याचा आरोप देखील सुळें यांनी राज्यसरकारवर केला..