मुंबई : आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेले आहे. दरम्यान, निवडणुकीचा निकाल पूर्ण समोर येणे आणखी बाकी आहे. मात्र आतापासून भाजपकडून विजयाची भाषा करण्यात येत आहे.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर ट्विटवरून विजयाचे ट्विट केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी,ग्रामपंचायत निवडणुकीत बीड़ जिल्ह्यात आमचीच सरशी असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदनही केले आहे.
ग्राम पंचायत निवडणुकीत बीड़ जिल्ह्यात आमचीच सरशी…अभिनंदन आमच्या कार्यकर्त्यांचे…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 20, 2022
दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठीही रविवारी मतदान पार पडले. यापैकी बीडमधील ६७० ग्रामपंचायतींचा निकालही आज जाहीर होत आहे.