Ramiz Raja – पुढील वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषक आणि आशिया चषक या स्पर्धांवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागील काही दिवसांपासून बराच वाद सुरु आहे. भारतीय संघ क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानात कधीही जाणार नाही, अशी भूमिका भारत सरकारकडून घेण्यात आली होती. त्यानंतर भारताला डिवचण्यासाठी पाकिस्तानकडूनही काही विधाने करण्यात आली.
#INDWvsAUSW | रिचा घोषची तुफानी खेळी व्यर्थ; ऑस्ट्रेलियाची मालिकेत विजयी आघाडी
पाकिस्तान संघही एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आलाच नाही तर तुमचा खेळ कोण बघणार? अशा शब्दांत पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी तर थेट भारताला धमकीच दिली. मात्र भारतासोबतच्या या वादाचा फटका आता स्वतः रमीझ राजा यांनाच बसणार आहे. कारण त्यांना पीसीबीच्या अध्यक्षपदांवरून हटवले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
#INDWvsAUSW | रिचा घोषची तुफानी खेळी व्यर्थ; ऑस्ट्रेलियाची मालिकेत विजयी आघाडी
पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनुसार, रमीज राजा यांच्या जागी नजम सेठी नवे पीसीबी अध्यक्ष बनणार आहेत. यापूर्वी २०१८ मध्ये इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान असताना नजम सेठी यांनी पीसीबीचे अध्यक्षपद सोडले होते. नजम सेठी यांनी १७ डिसेंबरला शनिवारी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली. या बैठकीनंतर ते पीसीबीचे नवे अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
रमीझ राजा यांची २०२१ मध्ये पीसीबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती. अध्यक्ष झाल्यानंतर रमीझ राजा हे प्रचंड चर्चेत राहिले. यानंतर त्याच्यावर खेळाडूंबाबत पसंती आणि नापसंतीचे अनेक आरोप झाले. त्यानंतर आता सध्या काही दिवसांपासून ते आशिया चषकाबाबत सतत वक्तव्ये करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या पदावर टांगती तलवार असल्याचे दिसत आहे.