मुंबई – भारतीय महिला क्रिकेट आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात सध्या ( INDW vs AUSW ) टी-२० मलिक खेळली जात आहे. या ५ सामान्यांच्या मालिकेतील ४ था सामना आज खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला ७ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आगोदरच मालिकेत आघाडीवर असलेल्या पाहुण्या संघाने आता ३-१ अशा फरकाने विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघाने ही मालिका गमावली असून शेवटच्या सामन्यात संघ आता प्रतिष्ठा वाचविण्यासाठी मैदानात उतरेल.
भारताच्या दृष्टिहीन संघाची हॅटट्रिक; सलग तिसऱ्यांदा जिंकला टी-20 वर्ल्डकप
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या ऑस्ट्रेलियाया संघाने २० षटकांत ३ गडी गमावून १८८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला ५ गडी गमावून १८१ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोष हिने शेवटच्या क्षणी दमदार झुंज दिली मात्र, ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. रिचाने अवघ्या १९ चेंडूत ४० धावा फाटकावल्या आणि नाबाद राहिली.
भारताच्या दृष्टिहीन संघाची हॅटट्रिक; सलग तिसऱ्यांदा जिंकला टी-20 वर्ल्डकप
एलिस पेरीच्या ४२ चेंडूत नाबाद ७२ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १८८ धावा केल्या. पेरीने आपल्या डावात ७ चौकार आणि ४ षटकार मारले. तिने अॅशले गार्डनरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूंत ९४ धावांची भागीदारी केली. गार्डनरने २७ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. शेवटच्या षटकांत ग्रेस हॅरिसने केवळ १२ चेंडूत २७ धावांची आक्रमक खेळी केली. दीप्ती शर्माने २ तर राधा यादव १ फलंदाजाला बाद केले. भारतीय गोलंदाजांना पाहुण्या संघाला कमी धावांत रोखण्यात अपयश आले.
पाहुण्या संघाने दिलेल्या बलाढ्य लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून स्मृती मंधाना (१६ धावा) आणि शेफाली वर्मा (२० धावा) यांनी सावध सुरुवात सुरुवात केली. मात्र त्या दोघीही मोठी खेळी करू शकल्या नाहीत. भारताने ४९ धावांवरच ३ गडी गमावल्याने संघ अडचणीत सापडला. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि देविका वैद्य यांनी डावाला सावरले आणि भारतीय संघाच्या विजयाच्या आशा जाग्या केल्या. मात्र, मोठे फटाके खेळण्याच्या प्रयत्नात अगोदर हरमनप्रीत (४६ धावा) आणि त्यानंतर देविका वैद्य (३२ धावा) यांनी आपापली विकेट गमावली.
Close finish in the fourth #INDvAUS T20I but it was Australia who won the match! #TeamIndia will look to bounce back in the fifth & final T20I of the series on Tuesday 👍 👍
Scorecard 👉 https://t.co/kG4AnI9x7J pic.twitter.com/i3wgeyRxB2
— BCCI Women (@BCCIWomen) December 17, 2022
शेवटच्या काही चेंडूंमध्ये भारतीय संघाला जिंकण्यासाठी जास्त धावांची आवश्यकता होती. त्यामुळे विजय अशक्य वाटत होता, मात्र रिचाने पुन्हा एकदा आपला तुफानी अंदाज दाखवला आणि मोठे खेळण्यास सुरुवात केली. तिने दमदार खेळी करत १९ चेंडूंतच ४० धावा फाटकावल्या. तसेच दीप्ती शर्माने ८ चेंडूत १२ धावा केल्या. शेवटी भारतने हा सामना ७ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाकडून अलाना किंग आणि अॅशले गार्डनरने प्रत्येकी २-२ गड्यांना बाद केले. तर डार्सी ब्राउनने एक गडी बाद केला.