नवी दिल्ली – नेस्ले कंपनी भारतीय बाजारपेठेबाबत आशावादी आहे. भारतातील उत्पादन वाढविण्यासाठी ही कंपनी पुढील साडेतीन वर्षांमध्ये किमान 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक भारतात करणार असल्याचे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क सेंडलर यांनी सांगितले.
सध्या या कंपनीचे भारतात नऊ प्रकल्प आहेत. या गुंतवणुकीच्या आधारावर आणखी प्रकल्प निर्माण करण्यात येणार आहेत. या नव्या प्रकल्पामुळे भारतामध्ये रोजगार निर्मिती वाढण्यास मदत होणार आहे. भारतातील उत्पादनाची निर्यातही केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. ही कंपनी भारतामध्ये 110 वर्षापासून कार्यरत आहे.