मुंबई – भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी असलेल्या टीसीएसने वर्क फ्रॉम होम ( Work form home ) बंद केले असल्याचे वृत्त आहे. आता कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात येऊन काम करण्यास सांगण्यात आल्याचे बोलले जाते.
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा दिली होती. असा करोना संपुष्टात आला आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. अशा परिस्थितीत कार्यालयातून काम करण्याची गरज वाढली आहे.
कंपनीने म्हटले आहे की आता वरिष्ठ अधिकारी कार्यालयातून काम करतात. त्याचबरोबर ग्राहक कार्यालयात येत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येऊन काम करण्याची गरज वाढली आहे. आता कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात येत असून प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ठरविल्याप्रमाणे आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात येऊन काम करण्याची गरज आहे.
या नियमाचा भंग केल्यास कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. कंपनीचे 25% पेक्षा जास्त कर्मचारी घरातून काम करणार नाहीत याची काळजी घेण्यात येणार असल्याचे या कंपनीचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान बऱ्याच माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे कर्मचारी दुसऱ्या कंपनीसाठी अंशत: काम करीत असल्याचे आढळून आल्यानंतर काही कंपन्या कर्मचाऱ्यावर कार्यवाही करीत आहेत. त्याचबरोबर वर्क फॉर्म होम कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वृत्त आहे.