दुबई – आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्स राखून विजय मिळवलाय. नाणेफेक गमावल्यानंर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघानं भारतासमोर 20 षटकात 148 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं हे लक्ष्य 19.4 षटकांत पूर्ण केलं.
अखेरच्या षटकात भारताला 7 धावांची गरज असताना रवींद्र जाडेजा आऊट झाला. परंतु, हार्दिक पांड्यानं विजयी षटकार ठोकून पाकिस्तानला पराभूत केलं.
भारताकडून विराट कोहलीने 35 धावा, रवींद्र जडेजाने 29 चेंडूत 35 धावा आणि हार्दिक पांड्याने 17 चेंडूत 33 धावा केल्या. भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी निराशा केली. राहूल शुन्यावर तर रोहित शर्मा 12 धावा काढून बाद झाला. सूर्यकुमार 18 धावांवर बाद झाला
पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजने तीन आणि नसीम शाहने दोन गडी बाद केले. भारतीय संघ आता 31 ऑगस्ट रोजी त्यांच्या पुढील सामन्यात हाँगकाँगशी भिडणार आहे. त्याचवेळी 2 सप्टेंबरला पाकिस्तानचा संघ हाँगकाँगशी भिडणार आहे.
भारतानं घेतला पाकचा बदलाा….
आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सलग चौथ्यांदा पराभव केला आहे. यापूर्वी 2016 मध्ये भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केला होता. यानंतर 2018 आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने पहिल्या सामन्यात 8 गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात 9 विकेट्सने पराभव केला.
या विजयासह भारताने 2021 च्या टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला. 2021 च्या T20 विश्वचषकात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला. आता भारताने पाकिस्तानवर मात केली आहे.
तत्पूर्वी, भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवताना पाकिस्तानच्या प्रमुख फलंदाजांवर दडपण राखले. त्यांचा स्टार फलंदाज बाबर आझम याला डावातील तिसऱ्याच षटकात भूवनेश्वरने बाद केले व त्यांना मोठा धक्का दिला. त्यानंतर त्यांचे फलंदाज हात मोकळे सोडून आक्रमक फटकेबाजी करु शकले नाही. त्यामानाने सलामीवीर महंमद रिझवानने थोडी चमक दाखवली. त्याने 42 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार फटकावताना 43 धावांची खेळी केली. मात्र, तो अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला.
मधल्या फळीत इफ्तेकार अहमदने 22 चेंडूत 28 धावांची खेळी केली. त्यानंतर भरवशाचे खुशदील शहा व शादाब खानही अपयशी ठरले व पंड्याच्या उसळत्या तर भुवनेश्वरच्या स्विंग चेंडूवर बाद झाले. तळात हॅरिस राऊफ व शहानवाज दहानी यांनी फटकेबाजी करत संघाला 19.5 षटकांत सर्वबाद 147 अशी समाधानकारक मजल मारुन दिली. राऊफ 2 चौकारांसह 13 धावांवर नाबाद राहिला तर, शहानवाजने 2 षटकारांसह 16 धावा केल्या.
Four wickets from @BhuviOfficial and three from @hardikpandya7 as Pakistan are all out for 147 in 19.5 overs.#TeamIndia chase underway.
LIVE – https://t.co/o3hJ6VNfwF #INDvPAK #AsiaCup2022 pic.twitter.com/V2ftsLBGSa
— BCCI (@BCCI) August 28, 2022
भारताकडून भुवनेश्वरकुमारने सर्वाधिक 4 गडी बाद केले. हार्दीक पंड्याने 3 तर, अर्शदीप सिंगने 2 गडी बाद केले. आवेश खानने 1 बळी घेतला.