प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 16 -सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा झाला. ध्वजारोहण करण्यात आले. “सूर्यदत्त’च्या वाद्यवृंदाने गायलेल्या गीतांनी आणि संगीतमय वातावरणाने उपस्थितांची मने जिंकली. “सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
यावेळी अफगाण स्टुडन्ट असोसिएशन इन इंडियाचे अध्यक्ष वाली रहेमान रहेमानी, ज्येष्ठ नागरिक नीलकंठ बजाज, बबनराव दगडे पाटील, “सूर्यदत्त’चे समूह संचालक प्रा. डॉ. शैलेश कासंडे, राजीव श्रीवास्तव, प्रशांत पितालिया, किरण राव, प्रा. असिफ शेख, प्रा. अशोक तिवारी, प्रा मनीषा कुंभार, बाटु पाटील, नितीन कामठेकर, सचिन मेने, रावसाहेब पाटील, विद्यार्थी यांच्यासह विभाग प्रमुख, पालक, इतर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी आरव सुराणाने भाषण केले.
आर्यन जोशीने कविता वाचन केले. मनस्वी पारीख (बासरी), सक्षम अगरवाल (गिटार), देवांग देशपांडे (गिटार), श्रेया चतुर्वेदी (की-बोर्ड), सोहम कलबुर्गी (तबला), अथर्व सोनावणे यांनी वादन केले. गौरव शर्मा, विशाल बाबर यांनी संगीत संयोजन केले.