पुणे, दि. 16 – स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांचा त्याग, बलिदान यांचा प्रेरक इतिहास भारतास आहे. हा इतिहास तरुणांनी डोळ्यासमोर ठेवून भविष्याचा वेध घ्यावा, असे मत माजी राज्यमंत्री, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू व भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, स्वप्नाली कदम, सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे, व्ही. बी. म्हेत्रे, माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील, कुलसचिव जी. जयकुमार आदी उपस्थित होते. यावेळी भारती विद्यापीठाच्या शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व देशभक्तिपर गीते सादर केली.