नवी दिल्ली – भारतात सर्व स्तरावर मुलींमधील शिक्षण वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसून येत असून मुलींनी मध्येच शाळा सोडून देण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे 2020 21 या शैक्षणिक वर्षामध्ये देशातील तीन लाख मुलींनी मध्येच शिक्षण सोडले होते.
त्या पूर्वीच्या वर्षामध्ये हा आकडा तब्बल 11 लाख एवढा होता या वर्षी ज्या तीन लाख मुलींनी शिक्षण सोडले त्यापैकी 78% मुली फक्त गुजरात उत्तर प्रदेश आणि आसाम या तीन राज्यांमधील होत्या शिक्षण सुरु असतानाच मुलींनी शिक्षणाला रामराम ठोकण्यामागे जी विविध कारणे सांगितली जातात त्यामध्ये या मुलींचे अल्पवयात होणारे लग्न किंवा काही घरगुती कारणे हे सर्वात प्रमुख कारण मानले जाते लहान मुलांच्या शिक्षणाचा अभ्यास करणाऱ्या युनिसेफ या संस्थेने केलेल्या सर्व प्रमाणे 33 टक्के मुलींनी घरगुती कारण देऊन शिक्षणाला मध्येच राम राम ठोकला आहे तर 25 टक्के मुलींनी लग्नाच्या कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडले आहे ज्या मुलींनी घरगुती कारण देऊन शिक्षण अर्धवट सोडले आहे.
त्या मुली नंतर घर काम करताना दिसल्या किंवा आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांसोबत मोलमजुरी करण्यासाठी बाहेर जातानाही दिसल्या घरात एखाद्या नवीन मुलाचा जन्म झाला तर त्याला सांभाळण्यासाठी सुद्धा काही मुलींना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले आहे अर्थात देशात मुलींच्या शिक्षणाची संख्या वाढली असली तरी एकंदरच शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर घटला असल्याचेही या अहवालात म्हटले आहे पाच वर्ष सातत्याने शिक्षण घेणाऱ्या अनेक मुलींना एक वाक्य व्यवस्थित लिहिता येत नाही किंवा बोलता येत नाही असा निष्कर्षही काढण्यात आला आहे.
थिंक टॅंक सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट या संस्थेने केलेल्या संशोधनाप्रमाणे शैक्षणिक सुविधा वाढल्यामुळे शाळांमध्ये मोठ्याप्रमाणावर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला वर्गांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली त्याचा परिणामही शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये जगातील सर्वत्रच शैक्षणिक व्यवस्था ऑनलाइन मोडवर गेल्यामुळे त्याचाही शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम झाला आहे जागतिक बँकेने 2017 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालाप्रमाणे शिक्षकांचा दर्जा आणि शैक्षणिक संस्थांचे गैरव्यवस्थापन यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळू शकत नाही.