लखनौ – योगी सरकारमधील दलित समाजाचे मंत्री दिनेश खटीक यांनी राजीनामा दिल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अखिलेश यादव यांनी योगींवर निशाणा साधला आहे. बुलडोझर उलटेही चालते, असे त्यांनी म्हटले आहे.
मंत्री म्हणून आपल्याला महत्व दिले जात नाही, अशा आशयाची खंत खटीक यांनी व्यक्त केली असून त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यासंदर्भात बोलताना अखिलेश म्हणाले की, जिथे मंत्री म्हणून आदर तर मिळतच नाही; पण दलित म्हणून अपमान केला जातो अशा भेदभाव करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा राजीनामा देणे हाच आपल्या समाजाचा मान कायम राखण्याचा योग्य मार्ग आहे.
मुसेवाला हत्या प्रकरण; अमृतसरजवळ दोन आरोपींचा एन्काऊंटर
अखिलेश यांनी उत्तर प्रदेशातील सरकारच्या कथित भ्रष्टाचार आणि कुशासनाकडेही लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की, अगोदर लोकनिर्माण विभाग मंत्रालयात बंड झाले. त्यानंतर आरोग्य मंत्रालयात बंड झाले आणि आता जलशक्ती मंत्रालयातही बंड झाले आहे. आता कोणाची पाळी आहे, असा प्रश्न राज्यातील जनता भाजप सरकारला विचारत असून त्यांनी प्रामाणिकपणे या प्रश्नाचे उत्तर द्यावे.
पं. हरिप्रसाद चौरसिया यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर