राजगुरूनगर – चासकमान धरणाजवळील डोंगरावर असलेल्या सह्याद्री स्कुलमधील चार मुले चास कमान धरणाच्या हुतात्मा राजगुरू जलाशयात बुडाल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवारी (दि.१९) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, परिक्षीत आगरवाल, रीतीन डीडी हे दोन मुले आणि तनिष्का देसाई, नव्व्या भोसले या दोन मुली असे दहावीत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजते.
गुंडाळवाडी-बुरसेवाडी नजिक असलेल्या त्रिमूर्ती फौंडेशनच्या सह्याद्री स्कूलमधून आठ ते दहा मुले दुपारी चास कमानच्या हुतात्मा राजगुरू जलाशयात गेली होती. त्यातील चार मुले पाण्यात बुडाली. वास्तविक या शाळेतील मुलांना बाहेर सोडले जात नाही मात्र ही मुले बाहेर कशी आली हा प्रश्न समोर आला आहे.
यामध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला असुन त्यांचे मृतदेह पाण्यातुन सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. प्राथमिक माहितीनुसार, परीक्षित आगरवाल, तनिषा देसाई, ऋचादिदि, नव्या भोसले हे चारही मृत मुले परराज्यातील आहेत. पोलिस पंचनामा झाल्यावर सर्व घटना समोर येणार आहे. शाळा प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.