कोल्हापूर – कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक प्रचारात भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. दरम्यान, या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यास आपण हिमालयात जाणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
फुले … शाहू … आंबेडकर विचारांचा विजय …
कोल्हापूर ची जागा जिंकली …
शाहू महाराज कि jai— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 16, 2022
मात्र, आता पोटनिवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्या त्याच वाक्याचा आधार घेत महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटील यांना डिवचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर मीम पोस्ट करत खोचक टोला लगावला आहे.
नको परत या .. pic.twitter.com/JL89jsfRxb
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 16, 2022
कोल्हापूर निकालानंतर जितेंद्र आव्हाड ‘मी पोहोचलो रे हिमालयात..’ असं वाक्य लिहिलं आहे. हे ट्वीट शेअर करताना जितेंद्र आव्हाडांनी ‘नको, परत या’, अशी खोचक टिप्पणी केली आहे. सध्या आव्हाडांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.