मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यावर ही वेळ आली आहे. लक्षवेधी कालपासून लावत नसल्यामुळे सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे पाहायला मिळाले. पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील विषयावर शेळके यांनी लक्षवेधी लावली होती. मात्र ती लागत नसल्याने त्याची जाहीर नाराजी त्यांनी व्यक्त केली.
आमदार सुनील शेळके यांनी यावेळी म्हटले, जर पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचा यांनी विषय घेतला नाही. तर 2011 साली जे प्रकरण झाले होते. याची पुन्हा पुनरावृत्ती होईल. कारण त्यावेळी जे आंदोलन झाले होते ते याच विषयासाठी झाले होते असे त्यांनी सांगितले.
तसेच त्यांनी सांगितले की, अजित पवार यांची भेट घेतली त्यांनी मीटिंग लावण्याचे आश्वासन दिले आहे. विधानसभेत देखील मला मीटिंग लावण्याचे आश्वासन मिळाले आहे. त्यांना हा विषय मार्गी लावावाच लागेल, अन्यथा लढा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेळके यांनी दिला.
आमदार सुनील शेळके म्हणाले की, आमदारांना घरं देण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. कारण अनेक आमदार असे आहेत जे लोकवर्गणीतून आमदार आहेत. त्यांची परिस्थीत हालाखीची आहे. त्यांना घर मिळणे गरजेचं आहे. आमच्या सारख्या शहराच्या जवळ राहणाऱ्या सदन आमदारांनी मनाचा मोठपणा दाखवावा असेही ते म्हणाले. दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ग्रामीण भागातील आमदारांसाठी मुंबईमध्ये कायमस्वरूपी घरे बांधणार असल्याची घोषणा केली होती.