मुंबई – भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन याने कसोटीत 440 बळींचा पल्ला पार केला तेव्हा त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज डेल स्टेनला मागे टाकले.
आता सर्वाधिक कसोटी बळी घेतलेल्या गोलंदाजांच्या यादीत त्याला आपल्याच देशाचा महान फिरकी गोलंदाज अनील कुंबळे याच्या कामगिरीला मागे टाकण्याची संधी पुढील काळात मिळणार आहे. कुंबळेच्या नावावर 619 कसोटी बळी असून ही कामगिरी मागे टाकण्यात अश्विन यशस्वी होणार का हेच येत्या काळात स्पष्ट होणार आहे.