मुंबई :- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीनंतर आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयाण झाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसह राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राजशिष्टाचार राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला.
President of India Ram Nath Kovind and Smt Savita Kovind left for New Delhi on completion of their tour of Maharashtra. Governor Bhagat Singh Koshyari, Protocol Minister Aaditya Thackeray and others saw off the President at the airport. pic.twitter.com/Ol0rLAFP27
— Governor of Maharashtra (@maha_governor) December 9, 2021
यावेळी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक संजय पांडेय, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी हे देखील उपस्थित होते.