हडपसर – सामान्य जनतेच्या सुखासाठी झटणाऱ्या दिया फाउंडेशनने दीपावलीच्या सणात गरजू कुटुंबांच्या दारी आनंदाचा आकाशकंदील – पणती पेटवून, मिठाई देऊन सण गोड केल्याने जनता त्यांना विसरणार नाही, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केले.
दिया फाउंडेशन च्या वतीने आकाशकंदील, पणती आणि मिठाई वाटपाच्या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी शिवरकर बोलत होते. यावेळी दिया फाउंडेशन चे संस्थापक तथा पुणे शहर काँग्रेस आय कमिटीचे संघटक इम्रानभाई शेख, मार्गदर्शक अम्मी नसीम शेख, अल्ताफभाई शेख, गुलाब सय्यद, असलम शेख, तरन्नुम जमादार, अभिनेत्री नेहा, प्रिती सातारकर, रुक्सार, मुख्य बंदीर जोडपे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी दिया फाउंडेशनचे मतीन शेख, बाळासाहेब साबळे,सिटू सिंग कापसे,शरणापा कापसे, टिपू सय्यद, तौफीक शेख, हुजेफा शेख, अलीम बागवान, असलम सय्यद, जबार शेख, नीहाल मुलानी, अयुब अनसरी, साहील शेख, वसीम शेख, सुफियान काझी, अंकीता माने, सदफ काझी, अलीया सय्यद व रामभाऊ यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक इम्रानभाई शेख यांनी केले, आभार मतीन शेख यांनी मानले. यावेळी कोरोना चे सर्व नियम व अटीचे पालन करून महिला आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.