नवी दिल्ली – संसदेत तीन कृषी विधेयके मंजूर झाल्याच्या वर्षपुर्तीनिमित्त आज भारतीय किसान मोर्चाने जाहीर केलेल्या भारत बंदमध्ये कॉंग्रेस पक्ष सह देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
देशाची राजधानी दिल्ली बॉर्डरवर भारतीय किसान मोर्चाने जाहीर केलेल्या भारत बंदला रस्त्यावर जक्काजाम करत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
गुरुग्राम: दिल्ली-गुरुग्राम एक्सप्रेस वेवर गुरुग्राम-दिल्ली सीमेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, दिल्ली पोलिसांच्या बॅरिकेडिंगमुळे, शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या दृष्टीने, गुरुग्राममधील सिरहॉल टोल प्लाझाजवळ
अमृतसरमध्ये विविधी विद्यार्थी संघटना आणि शेतकरी संघटनांनी आंदोलन करत जीएनडीयू विद्यापीठाचं गेट अडवत आंदोलन केलं.
हरियाणातील सोनीपतमध्ये केंद्र सरकारच्या तीन कृषी सुधारणा कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’ दरम्यान सोनीपत-पानिपत रस्ता अडवला.
चेन्नईत शेतकर्यांच्या भारत बंदच्या समर्थनार्थ रास्ता रोको केल्याने पोलीस कर्मचारी कम्युनिस्ट पक्ष आणि विविध कामगार संघटनांच्या सदस्यांना रोखतात, चेन्नईमध्ये शेतकी कायदे रद्द करण्याची मागणी करतात.
महाराष्ट्रातही ठिकठिकाणी भारत बंदला पाठिंबा देत कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. जळगावमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी होत शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला.
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एम आय रोडवरील शहीद स्मारकाजवळही भारत बंदला पाठिंबा देण्यात आला.
बिहारच्या सितामंढी येथे वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी एकत्र येत नव्या कृषी कायद्यांना विरोध केला. तसेच आजच्या भारत बंदला पाठिंबा दिला.
ग्रेटर नोएडा: ग्रेटर नोएडामध्ये केंद्र सरकारच्या तीन कृषी सुधारणा कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’मुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प
तामिळनाडूतील थिरुपूर येथे भारत बंदला पाठिंबा देणाऱ्या आंदोलकांनी रस्त्यावर बसून आपला निषेध व्यक्त केला.