मुंबई – विजय वडेट्टीवार यांनी आपल्या गलथान कारभारामुळे ओबीसी व भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी असणाऱ्या ‘महाज्योती’ संस्थेला ‘येड्याची जत्रा अन खुळ्याची चावडी’ करून टाकली आहे, असं सांगतानाच पडळकर यांनी यूपीएससी परीक्षेवरूनही वडेट्टीवारांवर जोरदार हल्ला चढवला आहे.
अतिसन्माननीय #विजय_वडेट्टीवारांनी आपल्या गलथान कारभारातून #महाज्योती संस्थेची ‘येड्याची जत्रा अन् खुळ्याची चावडी’ करून टाकली आहे. तीन दिवसात कोणतीही पुर्वसुचना न देता #महाज्योती #UPSC च्या विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षा घेतंय.@CMOMaharashtra @BJP4Maharashtra @VijayWadettiwar pic.twitter.com/rvlK2AfjoH
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 11, 2021
त्यांनी विडिओ शेअर करत टीका केली आहे की,’अतिसन्माननीय विजय वडेट्टीवारांनी आपल्या गलथान कारभारातून महाज्योती संस्थेची ‘येड्याची जत्रा अन् खुळ्याची चावडी’ करून टाकली आहे. तीन दिवसात कोणतीही पुर्वसुचना न देता महाज्योती #UPSC च्या विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षा घेतंय’ असं म्हणत त्यांनी व्हिडियोमध्ये वडेट्टीवारांवर जहरी टीका केली आहे.
वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील ओबीसी भटक्या जाती जमाती यांचा जणू छळ करण्याचे ठरविलेच आहे. असा टोला लगावत पडळकर यांनी त्यातच आता त्यांनी एमपीएससी आणि युपीएससी परीक्षार्थ्यांच्या भविष्याचे कडेलोट करण्याचे त्यांनी ठरविले आहे. काल कोणतीही पूर्वसूचना न देता युपीएससीची चाळणी परीक्षा १३ सप्टेंबरला वडेट्टीवार यांनी जाहीर केली. आता विद्यार्थी येणार कसे? असा संतप्त सवाल पडळकर यांनी केला आहे.
दरम्यान,पडळकर आणि वडेट्टीवार यांच्या गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक वॉर सुरू आहे. वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा पडळकर यांनी केला होता. पडळकरांच्या या आरोपावर वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.