नवी दिल्ली – शिक्षण क्षेत्रातील हे परिवर्तन केवळ धोरणआधारित नाही तर ते जनसहभागावर आधारित आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची बांधणी आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये प्रत्येक पातळीवर सहभाग नोंदविणाऱ्या शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक, अभ्यासकांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. यातील सहभाग एका नव्या पातळीवर नेताना संपूर्ण समाजाला देखील यामध्ये सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी प्रत्येकाला केले.
गेल्या काही वर्षांत लोकसहभाग हा पुन्हा एकदा भारताचा राष्ट्रीय चेहरा बनू लागला आहे. गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये, लोकसहभागाच्या ताकदीमुळे, अनेक गोष्टी भारतात घडू लागल्या आहेत, अलिकडेच पार पडलेल्या ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक मधील आपल्या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीची आठवण त्यांनी करून दिली.
अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र, मूल्यांकन, पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक पद्धती आणि शासन प्रक्रिया या सारख्या परिमाणांसाठी सामान्य वैज्ञानिक चौकटीच्या अनुपस्थितीची कमतरता देखील दूर करेल. या झपाट्याने बदलणाऱ्या युगात, आपल्या शिक्षकांना देखील नवीन शिक्षण प्रणाली आणि तंत्रज्ञान या गोष्टी झपाट्याने आत्मसात कराव्या लागत आहेत. या बदलांसाठी “निष्ठा” या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे देश आपले शिक्षक घडविणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पंतप्रधानांनी शिक्षक पर्व परिषदेच्या उद्घाटन समारंभास आभासी माध्यमातून संबोधित केले. श्रवण दोष असलेल्यांसाठी ऑडिओ आणि मजकूर अंतर्भूत असलेली सांकेतिक भाषा व्हिडिओ, वैश्विक शिक्षण रचनेला अनुरूप भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोष, दृष्टिहीनांसाठी ऑडिओ स्वरुपातील बोलणारी पुस्तके, सीबीएसईच्या शालेय गुणपत्ता हमी आणि मूल्यांकन आराखडा, निष्ठा- निपुण भारत आणि विद्यांजली पोर्टल साठी शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम आदी उपक्रमांचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले.
देशात कठीण काळामध्ये देखील मुलांचे भविष्य घडविण्यासाठी शिक्षकांनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. करोना साथीच्या काळात शिक्षणाचे आव्हान पेलल्याबद्दल पंतप्रधांनांनी विद्यार्थी, शिक्षक आणि समस्त शिक्षण क्षेत्राचे कौतुक केले आणि या कठीण काळाला सामोरे जाण्यासाठी ज्या क्षमता निर्माण झाल्या आहेत, त्या तशाच कायम ठेवण्याचे आवाहन केले.