टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या अ गटातील पात्रता फेरी मधील कामगिरीच्या जोरावर नीरजला थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला. नीरजने पहिल्या अटीनुसार म्हणजे 83.50 पेक्षा अधिक लांब भाला फेकत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
दरम्यान ऑलिम्पिक स्टेडियममध्ये 7 ऑगस्ट रोजी पुरुष भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. मंगळवारी भारताच्या अन्नू राणीला पात्रता फेरीमध्ये चांगली कामगिरी करता न आल्याने ती स्पर्धेबाहेर फेकली गेली.
Olympic debutant and promising athlete #NeerajChopra qualifies for Men’s Javelin throw finals after throwing an impressive distance of 86.65 metres in his first attempt in Group A of qualification round. #TokyoOlympics #Cheer4Indiapic.twitter.com/ELF8PfU5yK
— All India Radio News (@airnewsalerts) August 4, 2021
अ गटामध्ये नीरज 15व्या स्थानी होता. विशेष म्हणजे त्याने ही कामगिरी पहिल्याच प्रयत्न केली. फिनलॅण्डच्या लेस्सी इतीलातोलोसुद्धा अशाचप्रकारे अंतिम फेरीमध्ये स्थान पक्के केले आहे. ऑटोमॅटिक क्वालिफिकेशनच्या नियमांनुसार थेट अंतिम फेरीत पोहचला.
अंतिम फेरी गाठण्यासाठी पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये 83.50 मीटरपर्यंत भाला फेकणाऱ्या किंवा सर्वोत्तम 12 खेळाडूंना प्रवेश दिला जातो.
भारताने यंदा आपला ऑलिम्पिकमधील सर्वात मोठा चमू पाठवला असून त्यात 127 खेळाडूंसह 228 सदस्यांचा समावेश आहे. भारताला आतापर्यंत यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तीन पदके मिळविण्यात यश आले आहे. यामध्ये वेटलिफ्टींगपटू मिराबाई चानूने पटाकवलेलं रौप्य पदक, बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या कांस्यपदकासहीत भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिनाचे कांस्य पदकाचा समावेश आहे.