नदीकाठच्या गावांना सतर्कतचा ईशारा!
पवनानगर – पिंपरी चिंचवड शहरासह मावळ तालुक्याची तहान भागविणारे पवना धरण हे 85 टक्के भरले असुन पवना धरणातून आज (दि.29) दुपारी चार वाजल्यापासुन धरणातुन सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. विद्युत जनित्राद्वारे 1400 क्युसेक व सांडव्याद्वारे 2100 क्युसेक असे एकूण 3500 क्युसेक पाणी सोडले जाणार असल्याने नदीकाठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पवना धरण 85 टक्के भरल्याने पिंपरी चिंचवडसह मावळवासियांचा पिण्याच्या पाण्याची प्रश्न सुटला आहे. पवना धरण क्षेत्रात पाऊसाचे प्रमाण वाढलेले आहे व त्यामुळे धरणात येवा वाढल्यामुळे पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.त्यामुळे धरणामध्ये होणारी पाण्याची आवक जास्त असल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरुन आज दुपारी वाजता पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे .तरी पवना धरणाच्या खालील नदी तीरा कडील सर्व गावातील नागरीकानी दक्ष राहुन नदी तीरावरील त्यांचे सर्व जनावरे, मोटारी, अवजारे व इतर सामुग्री त्वरीत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे, जेणे करून कुठलीही जिवीत व वित्तहानी होणार नाही याची काळजी घेऊन जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन पवना धरण पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अशोक शेटे यांनी केले आहे.