कोलकाता – पश्चिम बंगाल मध्ये सरकारने विद्यार्थ्यांसाठी क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना दहा लाख रूपयांपर्यंतचे कर्ज घेता येणार आहे.
तृणमुल कॉंग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात हे आश्वासन दिले होते. त्याची आज पुर्तता करण्यात आली असून या योजनेला काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
बंगाल मध्ये दहा वर्षांचे वास्तव्य असणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे, पदव्युत्तर शिक्षण घेणारे, देशात किंवा विदेशात शिक्षण घेणारे अशा प्रकारच्या कोणत्याही विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या चाळीसाव्या वर्षापर्यंत विद्यार्थ्याला या योजनेचे कार्ड वापरता येणार आहे. विद्यार्थ्याने नोकरी लागल्यानंतर पंधरा वर्षांच्या अवधीत ही कर्ज फेड करायची आहे.