नवी दिल्ली – काँग्रेसशासित राज्यात मुख्यमंत्र्यांना तेथील नेत्यांच्या नाराजीला समोरं जावं लागत आहे. त्यामुळे सरकार धोक्यात येत. आता पंजाबमध्येही काँग्रेससमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर पक्षातील अनेक नेते नाराज असताना आता नवज्योत सिंग सिद्धू देखील आक्रमक झाले आहेत.
सिद्धू यांनी काँग्रेसवरच हल्लाबोल केला आहे. सिद्धू म्हणाले की, मी केवळ निवडणुकीत विजय मिळविण्यासाठीचा शोपीस नाही. तसेच आपल्याला पक्षात आणि राज्य सरकारमध्ये कोणतही पद नकोय. मात्र काँग्रेस नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचं सिद्धू यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान आपण कोणत्याही लालसेशिवाय राज्यात अमरिंदर सिंग सरकारला साथ देण्यास तयार आहे. मात्र सरकारने राज्यातील जनतेच्या हितासाठी योजना राबवाव्या. हे करण्यात सरकार अपय़शी ठरलं तर आपल्याला हे करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नाही, असा इशाराही त्यांनी दिली.
अनेक लोकांना वाटत निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सिद्धूचा वापर करावा. अशा यंत्रणेत राहून मी काम का करू ? असा सवाल करत मी एकट्याने काम करणे योग्य राहिल, जेणेकरून मला शोपीस म्हणून राहण्याची गरज भासणार नाही, असंही सिद्धू यांनी नमूद केलं.