कानपूर – फसवणूक झाल्याप्रकरणी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये ही घटना घडली आहे. यतींद्र तिवारी असे आत्महत्या केलेल्या तरुणाने नाव आहे. आत्महत्येपुर्वी यतींद्रने एक सुसाइड नोट लिहली सुसाइड नोटची सुरुवात ‘यह रातें, यह मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा’ हे गाणं लिहत केली आहे.
यतींद्र याची एकाने नोकरीच्या आमिशाने फसवणूक केली. या नोकरीसाठी त्याने एका सावकाराकडून 9 लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. मात्र त्याची फसवणूक झाली नोकरीही मिळाली नाही आणि सारवकाराचे कर्जही झाले त्यामुळे तो नैराश्यात गेला. दरम्यान सावकाराने पैसे परत घेण्यासाठी तगादा सुरु करत त्याला त्रास द्यायला सुरूवात केली. यातूनच यतींद्रने हे टोकाचे पाऊल उचलले.
या सुसाइड नोटमध्ये राजकिशोर नावाच्या व्यक्तीचे नाव आहे, या व्यक्तीने नोकरी लावून देण्यासाठी साडेतीन लाख रुपये आपल्याकडून घेतले होते. पत्नी माया हिने देखील आपल्याला बोलण्यात फसवून तीन लाख रुपये घेतले होते, असे लिहले आहे.तर अरविंद नावाच्या आणखीन एका व्यक्तीनं कल्याण विभागात नोकरी लावण्याच्या नावाखाली त्याच्याकडून अडीच लाख रुपये घेतले होते.
तसेच एक जवळचा मित्र सूरज गंगवारचा भाऊ आणि वहिनीकडून पाच लाख उसने घेतले होते. मात्र त्याची परतफे करणे लवकर शक्य नसल्यामुळे त्यांनी पोलिसांची भीती दाखवून संपूर्ण कुटुंबाला धमक्या देण्यास सुरुवात केली होती. त्याची चारचाकी गाडीही ते घेऊन गेले. ही सर्व हकीकत त्यानं सुसाईड नोटमध्ये लिहिली असून त्यानं बाराबंकीचे राजकिशोर, माया, अरविंद, लोकेश आणि मजहर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कल्याणपूरमधील सत्यम विहार येथे यतींद्र भाड्याच्या घरात राहत होता. तो गुटखा-सिगारेटचे दुकान चालवून कुटुंबाचा सांभाळ करीत होता. सुमारे आठवडाभरापूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. दोन दिवसांपासून घराचा दरवाजा कोणीच उघडत नसल्याचे पाहुन घरमालकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांना संशयास्पद अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे. मृतदेहाजवळ एक सुसाइड नोटही सापडली. त्याचे पोस्टमॉर्टम केले आहे. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कारवाई केली जाईल. असे पश्चिम कानपूरचे डीसीपी संजीव त्यागी यांनी माहिती देताना सांगितले आहे.