कोंढवा – कोंढवा-सासवड रस्त्यावरील बोपदेव घाटातील सीमाभिंत तुटली असून आतापर्यंत पाच जणांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे. सीमाभिंत दुरुस्ती निधी मंजूर झाला असूनही काम का केले जात नाही, असा सवाल करीत पश्चिम महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
भाजपे ज्येष्ठ नेते कामठे म्हणाले की, कोंढवा-सासवड रस्त्यावरील बोपदेव घाटातील सीमाभिंतीच्या दुरुस्ती याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्यानंतर सीमाभिंत दुरुस्तीसाठी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, दुरुस्तीचे काम अद्याप सुरू केले गेले नाही.
यापुढे अपघातात कोणाचाही बळी गेला, तर त्याला सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, पुढील आठ दिवसांत सीमाभिंतीचे काम सुरू झाले नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांसमोर उपोषण करून तीव्र निषेध केला जाईल, असा इशारा कामठे यांनी दिला आहे.