बॉलिवूड अभिनेता गेल्या काही महिन्यांत झपाट्याने वर आला. त्याचा एक स्वतंत्र चाहता वर्ग त्याने निर्माण केला. बॉलिवुडमधील कपूर, खान, खन्ना आडनावापेक्षा वेगळे नाव असूनही स्वत:ची जागा निर्माण करणारे मोजकेच असतात.
त्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. या संघर्षाच्या काळात त्यांच्याकडून कळत न कळत कोणा प्रस्थापिताला मात दिली गेली की त्यांचे मग दिवस फिरतात. सुशांत सिंह राजपूतच्या बाबतीत तेच झाले. असाच काही प्रकार कार्तिकच्या बाबतीत होतो आहे का?
कार्तिक आर्यन सिनेसृष्टीत नवोदित कलाकार म्हणून ओळख मिळवत आहे. तसेच कार्तिक आर्यनचा अतिशय मनमोकळा स्वभाव आणि क्रेझी चाहता वर्ग ही त्याची खास गोष्ट आहे. मात्र कार्तिक सध्या आणखी एका गोष्टीवरून चर्चेत आहे. एकवेळ अशी होती जेव्हा कार्तिककडे खूप प्रोजेक्ट होते पण या सगळे आगामी प्रोजेक्टस त्याने गमावले आहेत.
सिनेमा दिग्दर्शक अनुभव सिन्हाने यावर ट्विट करताना म्हटलंय की,’एक गोष्ट सांगतो. जेव्हा एखादा निर्माता अभिनेत्याला ड्रॉप करतो तेव्हा त्याला यावर बोलायचं नसतं. अगदी दोघांनाही यावर बोलायचं नसतं.
असंच आतापर्यंत पाहण्यात आलंय. कार्तिक आर्यनच्या विरोधात कॅम्पेन चालवण्यात येत आहे. हे खूप चुकीचं आहे. कार्तिक आर्यनच्या शांत स्वभावाचं कौतुक करतो मी.
सगळ्यात अगोदर करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’ सिनेमातून काढून टाकलं आहे. त्यानंतर त्याला आनंद एल रायच्या सिनेमातून देखील काढल्याच्या चर्चा रंगल्या. या सगळ्यावर फिल्ममेकर अनुभव सिन्हा यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
चित्रपटसृष्टीत काही घराणी निर्माण झाली आहेत. काही जण स्वत:ला आता या चित्रपटसृष्टीचे गॉडफादरही समजत असतील. त्यांना हवा तो सुपरस्टार आणि हवा तो बॉलिवुडच्या बाहेर असा त्यांचा खाक्या. आपलाच गोतावळा सांभाळण्यात त्यांना स्वारस्य.
यात अनेक गुणी कलाकार भरडले जात आहेत. वेळ पडली तर पाकिस्तानातून कलाकार आयात केले जातात. मात्र आपल्याच देशातील कलाकारांचा पध्दतशीर काटा काढला जातो. हे कोणते नवे वळण आहे? ते वेळीच रोखलेले बरे.