मुंबई | राज्यात काही घटना घडली की त्याचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी सनसनाटी घटना तयार करायची अशी भाजपाची भूमिका अनेकदा दिसून आली आहे. केंद्रीय संस्था भाजपच्या हाती असल्याने ते सांगतील तीच गोष्ट होते. वास्तविक ऑक्सिजन, रेमडेसिवीर याबद्दल केंद्र सरकारमध्ये अत्यंत नाराजी आहे. त्यांचे वाटप, त्यांची सापत्न वागणूक, लोक तडफडत आहेत याकडे केंद्राचे लक्ष नाही, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्र सरकारवर केली.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/154907246481097/
ते पुढे म्हणाले, पश्चिम बंगाल येथे निवडणुकीसाठी जाऊन एका महिलेला हरविण्यासाठी प्रयत्न सुरू असून या सर्व प्रकरणावर एका माजी पोलीस प्रमुख अधिकाऱ्याने लेख लिहिला आहे. ज्यात त्यांनी उल्लेख केला होता की, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात जाऊन दबाव आणावा हे फार चुकीचे आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही स्वस्थ रहा असा सल्लाही त्यांनी लेखातून दिला आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.
तसेच नियतीने जे लिहिलं आहे त्याच वेळी शपथ होईल. मी पुन्हा येईल बोलून काही होणार नाही असा टोला देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना यावेळी लगावला.