अहमदाबाद – फलंदाजी व गोलंदाजीतही अपयश आल्यामुळे तिसरा टी-20 सामना गमावलेल्या भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात विजय मिळवण्याची नितांत गरज आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत आजच्या सामन्यात विजय मिळवत बरोबरी केली तरच अखेरच्या पाचव्या सामन्यातील विजयासह मालिका जिंकण्याची आशा निर्माण होणार आहे. त्यासाठी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघासाठी आजचा सामना “करो या मरो’, अशा स्थितीत आहे.
भारतासाठी महत्वाचा असलेल्या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार इयान माॅर्गन याने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचरण केले आहे.
England choose to bowl in the fourth T20I.
What target will India set for them?#INDvENG pic.twitter.com/gZNbbJuA2R
— ICC (@ICC) March 18, 2021
दरम्यान, आजचा म्हणजेच चौथा टी-20 सामना गमावला तर भारतीय संघ मायदेशात पहिल्यांदाच इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका गमावेल. विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारत व इंग्लंड या दोन्ही संघात चांगलीच चुरस रंगण्याची अपेक्षा आहे. झालेल्या चुका विसरून भारतीय संघाची कामगिरी दर्जाला साजेशी होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.