मुंबई – महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी माजी सनदी अधिकारी संजयकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजयकुमार हे माजी आएएस अधिकारी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी रात्री त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला.
कुमार हे नुकतेच म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी राज्याच्या मुख्य सचिव पदावरून निवृत्त्त झाले आहेत. त्यांना पाच वर्षांचा कालावधी मिळणार आहे. वीज नियामक आयोग हा वीज कंपन्या आणि ग्राहक यांच्यातील मधला दुवा असल्याने ही एक महत्वाची संस्था मानली जाते.
कोणत्याहीं सरकारी अथवा खासगी वीज कंपनीला ग्राहकांसाठी दर वाढवायचे असतील तर त्याला या नियामक आयोगाची अनुमती मिळणे आवश्यक असते. ही वीज दरवाढ संयुक्त असेल आणि ती ग्राहकांवर अन्याय करणारी नसेल तरच हा आयोग अशा प्रस्तावांना मान्यता देत असल्याने ग्राहकांसाठीहीं ही एक महत्वाची यंत्रणा आहे.