मंचर (पुणे) -धामणी (ता. आंबेगाव) येथील रस्त्यावर उभी असलेली कार जळाली; मात्र जीवितहानी झाली नाही. कार कोणाच्या मालकीची आहे ते समजले नाही. शिवाय गाडीचा क्रमांकही मिळाली नाही. त्यामुळे हा मोठ घातपात आहे का, असा संशय व्यक्त होत आहे.
धामणी गावातील द्रोणागिरी मळ्याच्या पुढे लोणी बाजूला रस्त्यावर एक कार पेटून जळाली आहे. गाडी जळाली, नंबर मिळाला नाही. मालकाचे नाव समजले नाही. त्यामुळे परिसरात ऊलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. या संदर्भात सरपंच सागर जाधव व तंटामुक्तीचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी मंचर पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजू कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पुढील तपास पोलीस जवान विलास साबळे करीत आहेत.