मुंबई: मुंबईत कारणाशिवाय घरापासून 2 किमी परिघाबाहेर फिरण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. तरी नियमाचा भंग करून मुंबईत फिरणारी 6800 वाहने काल पोलिसांनी जप्त केली आहेत.
केवळ ऑफिसला जाण्यासाठीच दोन किमी परिघाबाहेर जाण्यास अनुमती आहे किंवा वैद्यकीय कारणासाठी त्यात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, अन्य कारणासाठी मुंबईत वाहनांचा वापर करण्यावर सध्या बंदी आहे. त्याच्या कारवाईत ही वाहने जप्त करण्यात आली आहेत.
मुंबईत करोनाचा प्रसार अजून आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या मुक्त फिरण्यावर सध्या कमालीचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ही उपाययोजना नागरिकांच्याच सुरक्षेसाठी आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. मुंबईत लोकल बस व टॅक्सी सेवा अजूनही बंदच आहे. त्यामुळे लोकांचे मात्र हाल सुरू आहेत.