पुणे – “एनटीपीसी’च्या सोलापूर औष्णिक प्रकल्पांतील विजेचे संच दि. 6 एप्रिलपासून तांत्रिक कारणामुळे बंद होते. मात्र, विजेचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर भारनियमन सुरू झाले. त्यामुळे नामुष्कीची वेळ आली होती. अखेर हे संच दुरुस्त करण्यात आले असून, या औष्णिक प्रकल्पातून 525 मेगावॅट वीज मिळविण्यात महावितरणला यश मिळाले आहे.
वीज खरेदीचा करार केलेल्या कंपन्यांकडून प्रामुख्याने कोळसा टंचाई तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे वीज कमी मिळत असल्याने सुमारे 2300 ते 2500 मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली होती. परिणामी, राज्यात भारनियमन केले जात आहे. त्यातही देशात कोळसा व वीज टंचाईचे स्वरूप तीव्र असल्याने विजेच्या उपलब्धतेबाबत अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.विजेच्या तूट भरून काढण्यासाठी अतिरिक्त स्वरूपात वीज उपलब्ध करण्याचे प्रयत्न महावितरणने सुरू केले आहेत. दरम्यान, एनटीपीसीच्या असल्याने 525 मेगावॅट विजेचा पुरवठा बंद झाला होता.
या वीजसंचाची तत्काळ दुरुस्ती करण्यासाठी विशेष पाठपुरावा करण्यात आला. परिणामी वीजसंचाची दुरुस्ती करण्यात आली व सोलापूर औष्णिक प्रकल्पातून 525 मेगावॅट वीज महावितरणसाठी उपलब्ध झाली आहे. त्यातही देशात कोळसा व वीज टंचाईचे स्वरूप तीव्र असल्याने विजेच्या उपलब्धतेबाबत अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती. विजेच्या तूट भरून काढण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात वीज उपलब्ध करण्याचे प्रयत्न महावितरणने सुरू केले. याच प्रयत्नांमुळे सद्यस्थितीत पुरेशी वीज उपलब्ध झाल्यामुळे तीन दिवसांपासून कृषिपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे, असे महावितरणने म्हटले आहे.