रांची – झारखंडमधील चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 52 जणांना वेगवेगळ्या मुदतीच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यातील सर्वाधिक कालावधीची शिक्षा 3 वर्षांची आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तर अन्य 35 जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश विशाल श्रीवास्तव यांनी हा निकाल सुनावला आहे. दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींना 1 सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे, असे बचाव पक्षाचे वकील संजय कुमार यांनी सांगितले.
हे प्रकरण बिहारमधील दोरांदा येथील कोषागारातून 36.59 कोटी रुपये अवैधरितीने काढून घेण्याशी संबंधित आहे. हा निधी कोषागारातून 1990 ते 1995 दरम्यान काढण्यात आला आहे.
दोरांदा, देवघर, डुमका आणि चौबासा येथील कोषागारातून अवैधरितीने निधी काढून घेतल्याचे हे प्रकरण जेंव्हा उघड झाले, तेंव्हा झारखंड राज्य बिहारचाच भाग होते. राष्ट्रीय जनता दल प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना या हाय प्रोफाईल प्रकरणात दोषी ठरवले गेले आहे. ते सध्या प्रकृतीअस्वास्थ्यतेमुळे जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.