मेरठ – येथे पाच कावड यात्रेसाठी निघालेल्या भक्तांचा वेदनादायक मृत्यू झाला आहे. हाय टेन्शन वायरचा करंट लागल्यामुळे ५ भक्तांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय या दुर्घटनेत अन्य 10 भक्त गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भक्तांकडून संताप व्यक्त केला असून प्रचंड गोंधळ उडाला आहे.
शनिवारी रात्री आठ वाजता कावड घेऊन भक्त गावात पोहोचले तेव्हा रस्त्याच्या कडेला तार लोंबकळत होती. यादरम्यान भक्तांचा डीजेने त्या ताराला जीपकला. त्यामुळे आधी त्या डीजेमध्ये करंट वाहू लागला आणि नंतर काही वेळातच एक एक करून अनेकांना करंट लागला. कोणाला काही समजण्याआधीच पाच भक्तांचा वेदनादायक मृत्यू झाला. अनेक भक्त गंभीररित्या जळाल्याचे सांगण्यात येत आहे.
यूपी पश्चिममधून मोठ्या संख्येने लोक कावड घेण्यासाठी हरिद्वारला जातात, अशात रस्त्यावर हाय टेंशन वायर कशी पडली हा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसे, याआधीही दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर एका महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. त्यातही हाय टेंशन वायरच्या संपर्कात आल्याने हा अपघात झाला होता.