राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स व पेढ्या सायंकाळी साडेसहा वाजताच बंद ठेवण्याचा आदेश
मुंबई, ता. 10 – महाराष्ट्रातील सर्व दुकाने, हॉटेल्स व व्यापारी पेढ्या यापुढे सायंकाळी साडेसहा वाजता बंद करण्यात येतील. महाराष्ट्र सरकारने येत्या 4-5 दिवसांसाठी ही उपाययोजना अंमलात आणण्याचे ठरविले आहे.
वीज पुरवठ्यात तीव्र स्वरूपाचा पेचप्रसंग निर्माण झाल्यामुळे ही गोष्ट करावी लागत आहे. राज्याचे उद्योगमंत्री ना. तिडके यांनी ही योजना पत्रकारांना सांगितली. नाशिकचे वीज पुरवठा केंद्र 15 जून रोजी तर ट्रॉम्बे वीज पुरवठा केंद्र 18 जून रोजी सुरू होईल.
तीन शेजारी राज्ये वीज पुरवणार
महाराष्ट्रातील वीज पुरवठ्यातील अकस्मात पेचप्रसंग निर्माण झाला. त्यातून सुटका व्हावी म्हणून गुजरात, मध्य प्रदेश व म्हैसूर ही राज्ये महाराष्ट्राला वीज पुरविणार आहेत असे समजते.
आता संततीप्रतिबंधक लस
नवी दिल्ली – पुरुषांना संततीप्रतिबंधक लस टोचण्याचा शोध पश्चिम जर्मन वैद्यकीय संशोधकांनी लावला आहे. त्यामुळे शुक्रजंतूंना गर्भाशयात जाण्यास अडथळा निर्माण केला जाईल. यापूर्वी संततीप्रतिबंधक गोळी खाण्याने स्त्रियांत अनेक आजार निर्माण होतात.
मुक्तिसंग्राम सुरू कराल तरच तराल!
भुज (कच्छ) – संरक्षणमंत्री जगजीवनराम यांनी आज हरिजनांना असा संदेश दिला की, त्यांनी समाजाकडून न्याय मिळावा म्हणून मुक्तिसंग्राम सुरू करावा. हरिजनांनी त्यागास सिद्ध व्हावे तरच त्यांना काही साध्य होईल.
उपयुक्त शोध
नवी दिल्ली – कामावर असताना “डुलकी’ घेणाऱ्यांना ताबडतोब हुडकून काढणारे यांत्रिक साधन अमेरिकेतील संरक्षण खात्याने शोधून काढले आहे. या साधनाच्या वापरामुळे मोटार, विमान वगैरेचे आपणास कामी येतील.